अहमदनगर

नंदीग्राममध्ये हिंदू मतदारांमुळे विजय; सुवेंदू अधिकारी यांचे खळबळजनक विधान


कोलकाता

पश्चिम बंगालमधील भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम निवडणूक निकालांनंतर एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नंदीग्राममधील विजयाचे श्रेय हिंदू मतदारांना देताना त्यांनी स्पष्ट केले की, येथील मुस्लिम समुदायाचे संपूर्ण मतदान तृणमूल काँग्रेसला (TMC) मिळाले आहे, त्यामुळे ते आता केवळ नंदीग्राममधील हिंदू लोकांसाठीच काम करतील. सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात असतानाच, त्यांच्या या विधानामुळे 'सबका साथ, सबका विकास' हे ब्रीदवाक्य केवळ निवडणूक जाहीरनाम्यापुरतेच मर्यादित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नंदीग्राम हा अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे हिंदू मतदारांच्या एकगठ्ठा पाठिंब्यामुळेच आपला विजय सुकर झाला, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, संविधानाची शपथ घेण्यापूर्वीच अशा प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करणारी भूमिका घेणे कितपत योग्य आहे, यावर आता समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. काही लोक याला हिंदू-मुस्लिम राजकारण म्हणून विरोध करत आहेत, तर काही त्यांचे समर्थक या भूमिकेला स्पष्टवक्तेपणा मानत आहेत. एकंदरीतच, या विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या