छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे १ टन २ क्विंटल ६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याला पदरात काहीच पडले नाही, उलट त्याला १ रुपया खिशातून द्यावा लागला. शेतकरी प्रकाश गलंदर यांनी आपला कांदा विक्रीसाठी नेला असता त्यांना १२६२ रुपये उत्पन्न मिळाले, मात्र हमाली, तोलाई आणि वाहतूक असा एकूण खर्च १२६३ रुपये झाला. ४ एकर रानात कांदा लावण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले होते, पण बाजारभाव कोसळल्याने त्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले ५-६ लाखांचे कर्ज फेडण्याची आशा या पिकावर होती, मात्र हाती काहीच न आल्याने त्यांनी उरलेला कांदा शेतात फेकून दिला आहे. या घटनेनंतर कृषी विभागाने पंचनामा केला असून, विरोधकांनी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत तात्काळ मदतीची आणि हमीभावाची मागणी केली आहे.

0 टिप्पण्या