श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे या गावात बनामध्ये रविवारी (दि. 8 जून) हरित परिवार ग्रुप तसेच शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालय वांगदरी या शाळेच्या विद्यार्थीनी, घारगाव कृषी विद्यालयाचे विद्यार्थी व राजापूर माठ येथील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी रुजू झालेल्या कृषी अधिकारी श्रुतिजा वीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या अगोदर पाच वर्षांपूर्वी सदरील वर जमिनीवर 400 झाडांची लागवड करण्यात आली होती आज सदरील वृक्षांचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सदरील परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे.परिसरात पक्षांनी घरटी बांधलेली आहेत. पक्षांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर चिंभ ळा माध्यमिक विद्यालय चिंभळा या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रुतीजा वीर यांनी स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा तसेच नियमित अभ्यास केल्यावर यशाच्या उंच शिखरावर पोहोचता येते .विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करावे, जिद्द , चिकाटी ठेऊन नियमित अभ्यास करावा. वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम करतात ते हवेतील कार्बन ऑक्साईड वायू शोषतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी पाच झाडे लावावेत असे त्यांनी बोलतांना सांगितले..यानंतर संतोष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले करिअर साध्य करावे तसेच आजच्या या युगामध्ये मुली ह्या अभ्यासामध्ये सर्वात पुढे आहे असे त्यांनी बोलताना सांगितले विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करुन गुणवत्तेकडे लक्ष द्यावे तसेच चांगला अभ्यास करून यश मिळवावे असे त्यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले यावेळी चिंभळा शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब सावंत, संतोष गायकवाड, सचिन गायकवाड, राजेंद्र मूर्तमोडे , भैय्या गायकवाड,अमोल गायकवाड, अतुल गायकवाड, व हरित हरित परिवार संचलित सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते
0 टिप्पण्या